ipmnews1@gamil.com

भीमाशंकर मंदिराला श्रावणमासादरम्‍यान होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्‍यास मदत करण्‍यासाठी नवीन गर्दी व्‍यवस्‍थापन यंत्रणा सज्‍ज  

मोहित कंबोज भारतीय फाउंडेशनने ३० दिवसांच्या श्रावण यात्रेदरम्यान सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि दर्शन सहजसाध्‍य करण्यासाठी आगळ्यावेगळ्या गर्दी व्यवस्थापन पायलट प्रकल्पाची सुरुवात केली आहे, यशस्‍वी ठरल्‍यास हा प्रकल्‍प मोठ्या प्रमाणात स्‍वीकारला जाण्‍याची शक्‍यता आहे. भीमाशंकर, ५: भारतातील प्रमुख तीर्थस्थळांवर विशेषतः श्रावणासारख्या सणासुदीच्या महिन्यांत भाविक मोठ्या संख्‍येने येतात, परिणामत: गर्दी वाढते. ज्यामुळे सुरक्षितता, गर्दी नियंत्रण आणि एकूण तीर्थयात्रेच्या अनुभवाबाबत चिंता निर्माण होते. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून पूजनीय असलेले भीमाशंकर मंदिर येथे भाविक मोठ्या प्रमाणात येतात. मर्यादित प्रवेश असलेल्या डोंगराळ प्रदेशात वसलेले हे मंदिर श्रावणात लाखो भाविकांचे लक्ष वेधून घेते, ज्यामुळे अनेकदा लांब रांगा आणि गर्दी पाहायला मिळते. या दीर्घकालीन आव्हानाला तोंड देण्यासाठी मोहित कंबोज भारतीय फाउंडेशनने केअरटेनसोबत सहयोगाने भीमाशंकर मंदिरात संरचित, समुदाय-संचालित अतिरिक्‍त गर्दी व्यवस्थापन यंत्रणा सुरू केली आहे. हा उपक्रम सुरक्षितता वाढवण्यासाठी, यात्रेकरूंच्या हालचाली सुलभ करण्यासाठी आणि सहजपणे दर्शन अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. या उपक्रमाला भीमाशंकर मंदिर ट्रस्टचे पाठबळ आहे. हा उपक्रम मोठ्या प्रमाणात भाविक येणाऱ्या तीर्थस्थळांवर गर्दी व्यवस्थापन पद्धतींचे आधुनिकीकरण आणि सुव्यवस्थित करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या उपक्रमाचे वेगळेपण त्याच्या प्रबळ समुदाय-संचालित मॉडेलमधून दिसून येते. जवळच्या गावांमधील स्थानिक तरुणांना गर्दी व्यवस्थापन, प्रथमोपचार, संवाद आणि आपत्कालीन प्रतिसादाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. केअरटेनच्या तज्ञांच्या पाठिंब्यासह मोहित कंबोज भारतीय फाउंडेशनने वैज्ञानिक बॅरिकेडिंग, रांगांचे योग्‍य व्‍यवस्‍थापन, सीसीटीव्ही देखरेख आणि वॉकी-टॉकीसह सहज ओळखता येणाऱ्या पोशाखात प्रशिक्षित स्वयंसेवकांसह सर्वांगीण यंत्रणा लागू केली आहे. या ठिकाणी व्हीआयपी प्रवेश, शौचालये आणि प्रथमोपचारासाठी स्पष्टपणे चिन्हांकित केलेले झोन देखील आहेत….

Read More

माजी प्रधानमंत्री स्व.इंदिरा गांधींच्या ‘त्या’ आदेशाची अवमानना ! गरिबांची घर उध्वस्त होऊ देणार नाही-डॉ.हुलगेश चलवादी

‘इंदिरानगर’वासियांना वायूसेनेची नोटीस पुणे:- ‘गरिबी हटाओ’ची घोषणा देत गरिबांना मुख्य प्रवाहात आणणाऱ्या देशाच्या माजी प्रधानमंत्री स्व.इंदिरा गांधी यांचा आदेशाचा संरक्षण खात्याला विसर पडला आहे. स्वातंत्र्यापूर्वीची ‘बर्माशेल’ आणि आताची ‘इंदिरानगर’ ही वस्ती खाली करण्याची नोटीस वायूदलाने पाठवली आहे.गोरगरिबांच्या हक्काचे घर हिरावून घेण्याचा हा प्रयत्न आहे. परंतु, कुठल्याही परिस्थितीत झोपडपट्टीवासियांवर अन्याय होऊ देणार नाही,असे आश्वासन बहुजन समाज…

Read More

“मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजाची एकजूट ही काळाची गरज” : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

राज्य महिला आयोगामार्फत संवेदनशीलता ते संकल्प : शोषणाविरोधात लढा कृतीशाळेचे आयोजन मुंबई, दि. ३० जुलै २०२५ : “मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजातील सर्व घटकांनी कृतीशील सहभाग घ्यावा, ही केवळ भावना नाही तर काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील असून, मानवी तस्करीसारख्या गुन्ह्यांना आळा…

Read More

Online Gambling: ऑनलाईन जुगारावर बंदीसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार ! -गोवा व छत्तीसगड राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे आश्वासन !

ऑनलाईन जुगारावर नियंत्रणासाठी राष्ट्रव्यापी कायदा करण्याची सुराज्य अभियानाची मागणी देशभरात झपाट्याने वाढणार्‍या ऑनलाईन जुगारामुळे (‘रिअल मनी गेमिंग’मुळे) लाखो कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. काही हजार कोटी रुपयांची लुट होत आहे. यावर केवळ राज्यात कायदा करणे पुरेसे नसून राष्ट्रीय स्तरावर कठोर आणि प्रभावी कायदा करण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने गोवा राज्याचे…

Read More

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २० लाखांचा धनादेश

मुंबई,  :आज राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री मा. श्रीमती माधुरी ताई मिसाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक भान जोपासणारा उल्लेखनीय उपक्रम राबविला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त जनतेस एक विशेष आवाहन केले होते की, वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी फलक, बॅनर, पुष्पगुच्छ यावर खर्च न करता त्याऐवजी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत करावी. या…

Read More

बीफार्म आणि डीफार्म अभ्यासक्रमाच्या संस्थांना निकष पूर्ण करण्यासाठी एक महिन्याची अंतिम मुदत

सहसंचालकांमार्फत पाहणी करून अहवाल सादर करण्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आदेश मुंबई,  :- राज्यातील बी.फार्म आणि डी.फार्म अभ्यासक्रम चालवणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी सर्व आवश्यक निकष एक महिन्याच्या आत पूर्ण करावेत, अन्यथा त्यांच्या पहिल्या वर्षातील प्रवेश प्रक्रिया (कॅप राऊंड) रोखण्यात येईल, असा स्पष्ट इशारा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी…

Read More

केंद्र सरकार प्रमाणे राज्यात देखील रोलबॉल च्या खेळाडूंना नोकरीत आरक्षणासाठी प्रयत्न करणार – ना. चंद्रकांतदादा पाटील.

केनिया येथील स्पर्धेत सतरा वर्षाखालील मुलींचा रोलबॉल 🏀 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा “दादांच्या” हस्ते सत्कार !! अन्य खेळांप्रमाणे रोलबॉल खेळाचा देखील राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्काराच्या यादीत समावेश करण्यासाठी प्रयत्न करेन असे ना. श्री. चंद्रकांत दादा पाटील उच्च शिक्षण मंत्री आणि संसदीय कार्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी सांगितले. तसेच केंद्र सरकार च्या निर्णयाप्रमाणेच राज्यात देखील रोलबॉल च्या खेळाडूंना…

Read More

‘पिंची’च्या मंगळागौर स्नेहमेळाव्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नीलम गोऱ्हे,रुपालीताई चाकणकर यांच्या उपस्थितीत पारंपरिक खेळांना नवी उभारी पिंपरी: ‘पिंची’ हा पिंपरी -चिंचवड मधील महिलांचा सर्वात मोठा समूह आहे, यांनी आयोजित केलेला मंगळागौर व नागपंचमी स्नेहमेळावा मोठ्या जल्लोषात, उत्साही आणि पारंपरिक वातावरणात नुकताच पार पडला. या विशेष कार्यक्रमाला महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रुपालीताई चाकणकर यांची प्रमुख…

Read More

रिपब्लिकन पक्षाच्या मार्गदर्शन शिबिरास कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पुणे शहरच्या वतीने  सिहंगड पायथा, डोणजे या ठिकाणी एक दिवसीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,  शहराध्यक्ष संजय सोनवणे यांच्या नैतृत्वाखाली हे कार्यकर्ता शिबिर घेण्यात आले. एक दिवसीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर दोन सत्रामध्ये होते, पहिल्या सत्रात पक्ष संघटन व पक्ष बांधणी या विषया वर  कार्यकर्त्यांनी आपले मनोगत…

Read More

‘सत्यभामा’ ८ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार

नेहमीच रुपेरी पडद्यावरील कलाकृतींच्या माध्यमातून इतिहासाची पाने उलगडण्याचा प्रयत्न केला जातो. अशा कलाकृती रसिकांना केवळ भूतकाळात नेत नाहीत, तर त्या काळातील वास्तवतेचे दर्शनही घडवतात. बऱ्याचदा त्या काळातील काही चांगल्या-वाईट घटना वर्तमानातील जीवन सुखकर बनवण्यासाठी उपयोगी ठरतात. काही मात्र मनाला चटका लावून जातात. पूर्वीची सती प्रथा आज बंद झाली तरी ती पडद्यावर पाहताना मनाची घालमेल झाल्याशिवाय…

Read More